About the Book
माणसांना अनुभव नेमका कुठून मिळतो, यासंदर्भात संपूर्णतया नवा आयाम आणि विचारधारा या पुस्तकातून समोर येते, त्यामुळेच स्वतःच्या दुःखाचा अंत करून प्रत्येक क्षणी आपल्याला जसं वाटायला हवं असतं तशी निर्मिती करणं आपल्याला शक्य होतं. सर्व मानसिक आणि भावनिक दुःखांचं मूळ कारण समजून घेणं आणि त्याचा शेवट कसा करावा, नकारात्मक विचार आणि भावनांपायी स्वतःवर परिणाम कसा होऊ द्यायचा नाही, आपण जेव्हा नकारात्मक विचारांच्या फासात अटळपणे अडकतो, तेव्हा त्यातून मुक्तता कशी करून घ्यायची यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे या पुस्तकातून आपल्याला मिळतील.