About the Book
चाणक्य हे जगातील सर्वोत्तम रणनीती तज्ज्ञांपैकी एक होते. ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकात त्यांनी अर्थशास्त्र हा अतुलनीय राजकीय प्रबंध लिहिला, तेव्हापासून जगभरातील नेते या ग्रंथाचा उपयोग करत आहेत. प्रस्तुत पुस्तकात लेखकाने सर्वसामान्यांसाठी चिंतन कलेवर चाणक्यांच्या युगांपूर्वीच्या ज्ञानाचं सार मांडलं आहे. लेखक ज्यासाठी सुपरिचित आहेत, त्या व्यावहारिक आणि नावीन्यपूर्ण दृष्टिकोनाच्या आधारे त्यांनी हा विषय उलगडला आहे.
About the Author(s)
व्यवस्थापन विषयातील वक्ते आणि योजना सल्लागार म्हणून राधाकृष्णन पिल्लई हे जवळपास पंचवीस वर्षं कार्यरत आहेत. याच विषयावर त्यांचे 200 लेख व पेपर्स प्रसिद्ध आहेत. अर्थशास्त्र या विषयात त्यांनी मुंबई विद्यापीठातून पीएचडी प्राप्त केली आहे. त्यांनी ऑक्सफर्ड, केंब्रिज यांसारख्या अनेक प्रतिष्ठित संस्थांमध्ये शिकवलं आहे. ‘चाणक्य इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ लीडरशिप स्टडीज (उखखङड), मुंबई विद्यापीठ’ येथे ते उपसंचालक म्हणून कार्यरत आहेत.