About the Book
या पुस्तकातून केवलादेव पक्षी अभयारण्याविषयी, तिथं असलेल्या विविध पक्ष्यांविषयी माहिती मिळते. भरतपूरचा राजा सुरज मल (आठव्या शतकाच्या मध्यात) याने केवलादेव मंदिराजवळील नदीवर धरण बांधलं. या धरणामुळे परिसरात पाणथळी निर्माण झाल्या. या पाणथळीवर अनेक पक्षी यायला लागले. 1976 साली या भागाचं रूपांतर पक्षी अभयारण्यात केलं गेलं. आशियामध्ये पक्षी निरीक्षणासाठी असलेल्या जागांपैकी उत्तम जागा म्हणून या अभयारण्याची ओळख आहे. 1985 साली हे जागतिक वारसा स्थळ घोषित केलं गेलं.