About the Book
एका डिजीटाइज्ड शहरात नजीकच्या भविष्यकाळात कधीतरी शुचितेच्या, शुद्धतेच्या हव्यासापोटी समाजांना विभाजित करणार्या आणि त्यांच्यावर मर्यादा घालणार्या भिंती उभ्या राहतात. त्या भिंतींमागे कडक नागरी शिस्त असते. त्याला एके काळची श्रीमंत आणि काहीसा स्वच्छंदी स्वभाव असलेली शालिनी बळी पडते. एका दुःखद उन्हाळ्यात लैला ही तिची मुलगी तिच्यापासून दुरावते. त्यानंतर सलग सोळा वर्षं शालिनी लैलाचा शोध घेत असते. सभोवतालची देखरेख यंत्रणा आणि लबाड रिपीटर्स यांच्या तडाख्यात शालिनी बाजूला फेकली जाते; पण फक्त तिच्या मुलीच्या शोधामुळेच ती पुढे पुढे जात राहते. त्यानंतर काय घडतं ही प्रेमाची, विश्वासाची आणि या सर्वांहूनही अधिक प्रमाणात वैफल्याची कथा आहे.