About the Book
आजच्या धकाधकीच्या जगात आनंद हरवत चालला आहे. याचं मुख्य कारण आहे,‘'परावलंबन.' कधी आपल्याला वाटतं परीक्षेत चांगले गुण मिळाल्यावर आपण आनंदी होऊ, तर कधी वाटतं प्रमोशन झाल्यावरच आपण आनंदी होऊ. पद, पैसा, प्रतिष्ठा, सत्ता, लौकिक यश, सुखसुविधा, मधुर नाती यांवरच आपला आनंद अवलंबून असतो, पण या गोष्टी प्राप्त झाल्यावरही माणसाच्या आयुष्यात त्याला एक पोकळी जाणवते. काय असतो बरं आनंदाचा अचूक पासवर्ड? प्रस्तुत पुस्तकात राजयोगिनी शिवानी हाच रहस्यभेद करत आहेत.
About the Author(s)
राजयोगिनी ब्रह्माकुमारी शिवानी सन 1996पासून ब्रह्माकुमारी प्रणित राजयोगाची साधना करत आहेत. आपल्या दैनंदिन जीवनात तर्काधिष्ठित आणि सुलभ मार्गाने आध्यात्मिक तत्त्वांचं आचरण करून ती कशा प्रकारे आत्मसात करावीत, याचं मार्गदर्शन त्या करतात. संपूर्ण जगामध्ये प्रवास करत असताना त्या अध्यात्म, स्व-सशक्तीकरण, भावनिक सौख्य, आनंद, नातेसंबंध आणि नेतृत्व या विषयांवरील त्यांच्या ज्ञानाचा खजिना जणू मुक्त हस्ताने वाटत असतात.
सुरेश ओबेरॉय हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय चित्रपट अभिनेते आहेत. त्यांनी आजवर 250हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाने सर्व प्रकारच्या माध्यमांमध्ये काम केले आहे. सन 1982मध्ये त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ते आध्यात्मिक जीवनशैलीचे खंदे पुरस्कर्ते असून, विविध व्यासपीठांवरून ते याचा प्रसार करत असतात.