About the Book
भारताची आर्थिक परिस्थिती खालावत असताना रघुराम राजन यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची सूत्रे हातात घेतली. अशा खळबळजनक काळात एखाद्या मध्यवर्ती बँकेच्या मुख्यपदाची जबाबदारी घेऊन, ती सक्षमपणे पेलताना आलेले अनुभव राजन यांनी यात व्यक्त केले आहेत. त्यांनी सध्याच्या आपत्तीपलीकडे विचार करून दीर्घकालीन विकास आणि स्थैर्य यांवर भर देणारा एक दृष्टिकोन मांडला आणि गुंतवणूकदारांचा विश्वास परत मिळवला. यात त्यांनी अनेक अर्थशास्त्रीय संकल्पना सहजपणे उलगडून सांगितल्या आहेत.
भारताच्या आर्थिक प्रगतीसाठी आवश्यक असलेले परस्परविषयक आदर आणि सहिष्णुता हे गुण किंवा राजकीय स्वातंत्र्य आणि समृद्धी यांतील परस्परसंबंध इत्यादी मुद्द्यांचा यात समावेश आहे.