About the Book
वयाच्या आठव्या वर्षी स्वप्नात परमेश्वराचं दर्शन झाल्यामुळे त्याला गाढ शांतता आणि आनंद यांची अनुभूती आली. परमेश्वराला भेटण्यासाठी, दिव्यत्वाची प्रचिती घेण्यासाठी त्यानं ज्योतिर्विद्या, उत्कट ध्यान आणि तंत्र यांचा अवलंब केला; पण तरी परमेश्वरदर्शन होण्याचं चिन्ह दिसेना. दारुण निराशेच्या भरात त्यानं आंतरिक अस्वस्थतेपासून सुटका मिळवण्यासाठी भौतिक स्वप्नांचा पाठपुरावा सुरू केला; पण भौतिक सुखांनी आतली पोकळी भरून येण्यासारखी नव्हती. अखेर त्याने संसाराचा परित्याग केला आणि तो संन्यासी बनला. आजकालच्या आव्हानपूर्ण आणि बव्हंशी संभ्रमाच्या काळात आध्यात्मिक जीवनाची जडणघडण कशी होऊ शकते, याची ही विस्मयकारक स्मरणगाथा आहे.