About the Book
पुरातत्त्व शास्त्रज्ञांच्या मते महाबलिपुरम (किंवा मामल्लापुरम) येथील शिल्पं सातव्या आणि आठव्या शतकात पल्लव राजांच्या काळातील आहेत. एकाच दगडात कोरीवकाम करून उभी केलेली मंदिरं, सुट्टी उभी असणारी दगडी शिल्पं ही येथील वास्तूंची वैशिष्ट्यं आहेत. समुद्रकिनार्यावरील महाबलिपुरम येथील शिल्पं वाळूखाली गाडली गेली होती; पण 18व्या शतकात ती वाळूतून पुन्हा बाहेर आली. 1984 साली हे ठिकाण जागतिक वारसा स्थळ म्हणून जाहीर झालं. याविषयीची अधिक माहिती या पुस्तकातून मिळते.