About the Book
या कांदबरीत गौतम बुद्धाच्या प्रत्यक्ष आयुष्यातल्या अशा काही रिकाम्या जागा अत्यंत कल्पकतेने आणि काही तीव्र भावनिक प्रसंगांच्या, भावनिक संघर्षांच्या आधाराने भरून काढण्यात आल्या आहेत. सिद्धार्थला एका वाटिकेत भेटलेली ही तरुणी कोण होती आणि जगाकडे पाहण्याचा तिचा दृष्टिकोन कशामुळे बदलत गेला? वयाच्या सोळाव्या वर्षी तिने सिद्धार्थशी विवाह केला. त्या वेळी तिला कल्पना तरी होती का की, अगदी थोड्याच काळानंतर तिचं वैवाहिक आयुष्य एक अगदी संपूर्ण अपरिचित असं वळण घेणार आहे? या स्त्री-पुरुष समान नात्याचा पुरस्कार करणार्या कादंबरीतून आपल्याला भेटणारी यशोधरा ही बुद्धिमान आणि दयाळू वृत्तीची आहे आणि आध्यात्मिक बाबतीतलं ज्ञान पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांनाही मिळायला हवं, हा विचार समाज मनात रुजवून स्त्रियांना त्या वाटा मोकळ्या करून देण्याचा ध्यास तिच्या मनाने घेतलेला आहे.