About the Book
अंतराला आपल्या आईने घेतलेल्या निर्णयांमागील - गुरूसाठी लग्नबंधन तोडणं; भिकार्यासारखं रस्त्यावर मुक्काम करणं; अनोळखी चित्रकाराबरोबर एकत्र राहणं - कारणं कधीही समजली नाहीत... पण ताराला स्मृतिभ्रंश होऊ लागल्यावर मात्र त्या दोघींना छळणार्या, त्यांच्या सामायिक भूतकाळाशी तडजोड करण्यासाठी अंतराने प्रयत्न सुरू केले. या प्रयत्नांमध्येच अंतराला स्वत:च्या मनात दडलेल्या चिंता, अकारण वाटणारं भय आणि तारापेक्षा मीदेखील फारशी वेगळी नाही या वास्तवाची लख्ख जाणीव झाली. हे पुस्तक कौटुंबिक बंध आणि वंचना यातील अस्पष्ट रेषेचा वेध घेते. ही कादंबरी वाचकांना एकाच वेळी चकित आणि अस्वस्थ करते.